Skip to content

‘शबरी घरकुल’च्या लाभासाठी किती काळ प्रतीक्षा करावी लागणार?

‘शबरी घरकुल’च्या लाभासाठी किती काळ प्रतीक्षा करावी लागणार?

आमदार अभिजित वंजारी यांचा विधानपरिषदेत सवाल

 

मुंबई/नागपूर : महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आमदार अभिजित वंजारी यांनी अनुसूचित जमातीच्या गरजू लाभार्थ्यांसाठी शबरी घरकुल योजना प्रभावीपणे राबवली जावी, यासंदर्भात आज विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित केला.
प्रश्नोत्तराच्या तासात बोलताना वंजारी म्हणाले, राज्यातील अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना निवारा मिळवून देण्यासाठी शबरी घरकुल योजना राबवली जाते. सन 2021-22 पासून ते आता 2023-24 पर्यंत एकूण 2 लाख 41 हजार 670 घरकुल बांधायचे होते. या चार वर्षात एक लाख 80 हजार 484 इतक्या घरांना मंजुरी दिली आहे. निकषामध्ये असलेले 40 टक्के लाभार्थी पात्र ठरलेले आहे. परंतु, निधीअभावी 40 टक्के लोकांना घरकुल देण्यात येणार आहे. या उर्वरीत 40 टक्के लोकांना घरकुलासाठी किती काळ प्रतीक्षा करावी लागेल, असा प्रश्न उपस्थित करत या योजनेचा लाभ गरजू लाभार्थ्यांना तातडीने मिळावा यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी केली.
सरकारकडून उत्तर देताना संबंधित मंत्री महोदयांनी सांगितले की, शबरी घरकुल योजनेच्या अंमलबजावणीसाठी निधीची तरतूद करण्यात आलेली असून, लाभार्थ्यांची यादी अंतिम करून त्यांना लवकरात लवकर घरकुल उपलब्ध करून दिले जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *